
कुडाळ ता .10- जावली तालुकयातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या कुडाळ गावांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत सुधारीत योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली असल्याची माहिती सौरभ बाबा शिंदे यांनी दिली आहे.

कुडाळ हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे असल्याने येथील लोकवस्ती मोठी असून भविष्यातील पिण्याचे पाण्याचे उपलब्धता व महत्व लक्षात घेऊन श्रीमंत छ. मा.आ.शिवेंद्रराजे भोसले* यांच्या माध्यमातुन व मा.सौरभ बाबा शिंदे ह्यांच्या पाठपुराव्याने सदरच्या नविन योजनेसाठी तब्बल दहा कोटी चौतीस लाख आठ हजार चारशे चाळीस (₹१०,३४,०८,४४०)* रुपये मंजुर झाला आहे. मागिल योजना फक्त ९० लक्ष रुपये ची असल्याने त्यात सुधारणा करून त्याचा प्रस्ताव मंजुर करून घेण्यात आला आहे.
नविन सुधारीत योजनेमुळे कुडाळ मध्ये नविन पाण्याच्या अधिक क्षमतेच्या टाक्या- पाणी फिलट्रेशन प्लांट- सोलर सिस्टम- संपुर्ण गावाची पाईप लाईन- खोदकाम होईल तिथे कॅांक्रिटीकरण असे विविध गोष्टी ज्या जुन्या योजनेत न्हवत्या त्या ह्यात समाविष्ठ करण्यात आल्या आहेत.

नविन योजने अंतर्गत पाण्याच्या नविन टाकी ह्या पंचशील नगर – फुले नगर – डबडेवाडी – गोपाळपंताचीवाडी – वारागडेआळी शेजारील जुनी पाण्याची टाकी निर्लेखीत करून अधिक क्षमतेची नविन पाण्याची टाकी अशा पाण्याच्या टाकींचा समाविष्ठ ह्या नविन योजनेत झाल्या आहेत ज्या जुन्या योजनेत घेतल्या गेल्या नाहीत.
ह्याचे सर्व श्रेय मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.सौरभ बाबा शिंदे यांनी पाठपुरावा करून ही सुधारीत योजना कुडाळ ची मार्गी लावल्याने कुडाळ चा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुढील ५० वर्षांचा मार्गी लागणार आहे.
मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे कुडाळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी मनापासुन आभार मानले.

