जावळी

“प्रतापगड” साखर कारखान्याकडून प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा- जास्तीत जास्त ऊस गाळपास देण्याचे सौरभ शिंदे यांचे आवाहन

कुडाळ- अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रतापगड सहकारी कारखान्याच्या सन २०२४- २५ या चालू गळीत हंगामामध्ये १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गाळप झालेल्या ऊसाचे प्रती मेट्रीक टन रु. ३ हजार प्रमाणे होणारे ऊस बील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.तर अजूनही ज्या शेतकऱ्यांचे ऊस राहिले असतील त्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गाळपस देण्याचे आवाहन प्रतापगड चे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे.


राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा कारखान्याच्या मदतीने बंद अवस्थेत असलेला प्रतापगड कारखाना सुरू करण्यात आला असून या कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम जोमाने सुरु आहे. मागील हंगाम २०२३- २४ हा ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडलेला आहे. गळीत हंगाम २०२४- २५ हा पुर्ण क्षमतेने सुरु असून या हंगामामध्ये आता पर्यंत ६१ दिवसामध्ये १ लाख ३२ हजार ३९० मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी ११.४४ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ४८ हजार ५५० क्विंटल साखर पोती उत्पादित केलेली आहेत.

कारखान्याचे या हंगामामध्ये २ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ असून ते साध्य करणेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, संचालक मंडळ सदस्य तसेच कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button